संक्षिप्त श्रीसाईसच्चरित
शिर्डीत एक रोहिला | कुराणपठण करी ||
त्रासला गाव सारा | बाबा संतुष्ट तरी || अ.३ ||
नूर मुहम्मद जरी | जळी विसर्जन करी ||
सारी चित्रे संतांची | परी प्रतिमा बाबांची ||
सुरक्षित राहिली | मग मुहम्मद अली ||
नेउनी देई तीस | गुरु दाभोळकरांस ||
सिद्दीक फाळकेचा | गर्व मक्कायात्रेचा ||
करिती बाबा हरण | देती त्यास शिकवण || अ.११||
शिरडीत एक वेळी | झाल पाऊस वादळी ||
बाबांची आज्ञा होता | झाला पाऊस बेपत्ता || अ. ११ ||
एकदा मशीदीत | आग लागे अवचित ||
सटका आपटती | बाबा आग विझवती || अ.११ ||
वीरभद्राप्पाला | जन्म सापाचा मिळाला ||
चनबसाप्पा दीन | राही बेडूक बनून ||
दोघांच्या कथेतून | बाबा देती समजावून ||
संपत्तीची आसक्ती | करी आयुष्याची माती ||
बाबा जेव्हा निजती | वीट उशाशी घेती ||
झाडू मारताना कुणी | वीट गेली फुटूनी ||
बाबांना जेव्हा कळले | ते दु:खाने बोलले ||
'अरेरे, काय झाले | माझे कर्मचि फुटले ||फुटली नाही वीट ती | माझी कर्मदशा ती' ||
चांदोरकरांना I गोषातील ललना II
पाहण्या मोह होतो I परी संकोच वाटतो || || अ.||
सांगती बाबा त्यांस I निर्मिले सौंदर्यास II
ब्रह्मदेवे भूवर I ते पाहणे न गैर || || अ.||
घेऊन जाते हाती | बाबा गहू दळती ||
टाकुनी पीठ वेशीवरी | रोखतात महामारी || || अ.१||
अपरोक्ष बाबांच्या | वाड्यामध्ये झालेल्या ||
बोलण्यात काय आले | ते बाबांनी जाणले || || अ.२||
म्हणता दाभोळकर | 'काय गुरूची जरूर?' ||
नाव ठेविले बाबांनी | 'हेमाडपंत' म्हणुनी || || अ.२||
पढावे एका रोहिल्याने | कलमांस मोठ्याने ||
जरी लोक त्रस्त होती | बाबा त्यास न रोखती || || अ.३||
चांद पाटलाच्या | घोडीस हरवल्या ||
काढले शोधुनी | दिव्य दृष्टीने बाबांनी || ||अ.५||
चांद पाटलासोबत | बाबा धूपखेडात ||
गेले आणि शिरडीत | आले व-हाडासोबत || ||अ.५||
'आवो साईबाबा' स्वागत | म्हाळसापती करीत ||
नाव तेच कायमचे | जगी झाले बाबांचे || ||अ.५||
दीपोत्सवाकरिता | वाण्यांनी तेल न देता ||
बाबा ओतून पाण्यास | उजळती दिव्यांस || ||अ.५||
धोती-पोती-योगात | बाबा होते निष्णात ||
आंतडी बाहेर काढीत | आणि धुऊन टाकीत || || अ.७ ||
पोरीला लोहाराच्या | ज्वाळांतुनी भट्टीच्या
वाचविले बाबांनी | हात स्वत:चे भाजूनी || || अ.७ ||
दादासाहेबांच्या मुलाच्या | गांठींना प्लेगच्या ||
स्वत:वरी घेऊनी | निवारिले बाबांनी || || अ.७ ||
मुळेशास्त्रींना दिसुनी | येती बाबांच्या स्थानी ||
गुरु त्यांचे घोलपनाथ | जे झाले समाधिस्थ || अ.१२ ||
म्हणती चोळकर | मी खडीसाखर ||
वाटेन सर्वांस | पूर्ण होता नवस || || अ.१५||
वाटण्या खडीसाखर | जेव्हा होई उशीर ||
चहामध्ये चोळकर | न घेती साखर || || अ.१५||
वाटता खडीसाखर | बाबा म्हणती त्यावर
'साखर घातलेला | पाजा चहा याला' || || अ.१५||
स्थिरता लाभण्याला | काकाजींच्या मनाला ||
सप्तशृंगी वणीची | सांगे भेट घेण्या बाबांची || || अ.३०||
नवसाचे रौप्यस्तन | सप्तशृंगीला अर्पण ||
करावया माधवराव | गाठती वणीगाव || || अ.३०||
भेटती तेथे उभय | नसताना परिचय ||
कृपा होता बाबांची | पुरे कामना दोघांची|| || अ.३०||
विजयानंद यतिची | वेळ येता देह्त्यागाची ||
बाबा घेती वाचून | भागवत त्याच्याकडून || || अ. ३१ ||
वाघास रोगग्रस्ता | बाबांपाशी आणिता ||
बाबांना वंदून | त्याने सोडीले प्राण || || अ. ३१ ||
बाळाराम मानकर | हरिश्चंद्रगडावर ||
बाबांना मूर्तिमंत | जागेपणी पाहतात || || अ. ३१ ||
चांदोरकर-सुतेस | प्रसूतीला होता त्रास ||
विभूति आणि आरती | गंगागीरबुवांहाती || || अ.३३||
बाबा पाठवूनी | टांगेवाला होऊनी ||
गंगागीरबुवांसी | चांदोरकर-गृहासी || || अ.३३||
नेऊनी सोडती | आणि अंतर्धान होती ||
घेता विभूती | सुतेची होई प्रसूती || || अ.३३||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा